महाराष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिली सर्वात महत्वाची माहिती!

Farmers Electricity

Maharashtra Security Alert | भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात पोलीस, तटरक्षक दल आणि नौदल सतर्कतेच्या उच्चतम स्तरावर आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी दिली आहे. राज्याच्या सागरी सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

“सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर” – फडणवीस :

पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “सध्या संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. पोलीस, नौदल, आणि तटरक्षक दल आपापल्या पातळीवर नियमानुसार कार्यरत आहेत. लवकरच अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल.” (Maharashtra Security Alert)

भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान व पीओकेमधील 9 दहशतवादी तळांवर मंगळवार आणि बुधवारी क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यानंतर गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून जम्मू, उधमपूर, पठाणकोट आणि इतर लष्करी ठिकाणांवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न झाला. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी हे सर्व हल्ले निष्फळ ठरवले.

Maharashtra Security Alert | सागरी सुरक्षेवर विशेष भर :

मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेसाठी नौदल आणि तटरक्षक दल यांनी नियमित गस्त आणि सराव सुरू ठेवले आहेत. (Maharashtra Security Alert)

26/11 च्या पार्श्वभूमीवर ही दक्षता अधिकच महत्त्वाची ठरते. फडणवीस म्हणाले, “सागरी सुरक्षेच्या प्रत्येक बाबतीत मानक कार्यपद्धतीचे (SOP) काटेकोर पालन सुरू आहे.”

News Title : Police, Navy, and Coast Guard in Maharashtra on High Alert, Says CM Devendra Fadnavis

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .