औरंगाबाद | उत्तर प्रदेशातील या घटनेवरून महाराष्ट्रात राजकारण केलं जात आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.
रोह्याला चौदा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या मुलीला दरीत फेकून देण्यात आलं. पुण्यात एका तरुणीला डोंगरात नेऊन दगडाने ठेचून मारण्यात आलं. त्यावेळी राज्य सरकार झोपलं होतं का?, असा सवाल दरेकरांनी केला आहे.
महाराष्ट्रात अराजकता माजली आहे. राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. त्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांपासून ते राऊतांपर्यंत कोणीच बोलायला तयार नाही, असं दरेकरांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
जगातील कोणतीही ताकद मला पिडीतेच्या कुटुंबाला भेटण्यापासून रोखू शकत नाही- राहुल गांधी
पंतप्रधान मोदींच्या हस्ते सर्वात मोठ्या अटल बोगद्याचं उद्घाटन
राहुल गांधी मोटारसायकलवरुन हाथरसला जाण्याची शक्यता!
करण जोहरचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, म्हणाला…