पाटणा | काँग्रेस पक्ष जाती-धर्माच्या नावावर व्होट बँकेचे राजकारण करत होता. मात्र मोदींनी देशातील राजकारणाची संस्कृती बदलली, असं भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे.
जे. पी. नड्डा यांनी आज मोक्ष नगरी गया येथील गांधी मैदानातून व्हर्चुअलसोबतच अॅक्चुअल रॅलीला संबोधित केलं. यावेळी बोलताना नड्डांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या हातात सुरक्षित आहे. मात्र बिहारचं नेतृत्व नीतीश यांच्या हातात सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे बिहारमध्ये एनडीएचं सरकार आणण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रितपणे काम करावं लागणार आहे, असं जे. पी. नड्डा म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
चीनच्या पाठिंब्याने पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 लागू करु- फारुख अब्दुल्ला
आपण इंग्रजांना पळवून लावलं, तर कोरोना काय चीज आहे- उद्धव ठाकरे
“उद्धव ठाकरे खोटं बोलतायत, त्यांच्यामुळे दिवसाला पाच कोटीचं नुकसान होत आहे”
…तर शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पाडणारं कृषी धोरण स्वीकारणार नाही- उद्धव ठाकरे