मुंबई | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या सरपंच आणि पोलिस पाटील यांना 25 लाखांचं विमा संरक्षण द्या, अशी मागणी राष्ट्रवादी युवकने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी ही मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे.
गावातली कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचं मोठं काम सरपंच आणि पोलिस पाटील करत आहेत. ही जबाबदारी पार पाडत असताना जर त्यांना कोरोनाची लागण झाली किंवा त्यात त्यांचा अनावधानाने मृत्यू झाला तर त्यांना राज्य सरकारकडून 25 लाखांचं विमा संरक्षण मिळावं, अशी मागणी करणारं पत्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलं आहे.
दरम्यान, आमच्या या पत्राची दखल राज्य सरकार घेऊन आणि यावर योग्य ती कार्यवाही कले, असा विश्वास वाटत असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. यासंबंधी राज्य सरकार काय पाऊल उचलतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
मुंबईचं इटली होणार, आपल्याला खंबीर नेतृत्वाची गरज- रंगोली चंडेल
भारतात वटवाघळामुळे कोरोना पसरला का? ICMR चे संशोधक म्हणतात…
महत्वाच्या बातम्या-
उद्धव ठाकरे कधीही मंत्री नव्हते पण ते उत्तम प्रशासक- अशोक चव्हाण
विनय दुबेला मी ओळखत नाही; उलटसुलट चर्चेनंतर गृहमंत्र्यांचा खुलासा
सांगली पॅटर्न; विनाकारण घराबाहेर पडाल तर कोलांटउड्या माराल…!
Comments are closed.