Purandar Airport l पुरंदर (Purandar) विमानतळ प्रकल्पासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला तणाव लक्षात घेता, राज्य सरकारने मोठा निर्णय घेत सर्वेक्षण तात्पुरते थांबवले आहे. या प्रकल्पास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना आमंत्रण देत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट केले की, सरकार कोणताही अन्याय करणार नाही, मात्र प्रकल्प राबवण्याची भूमिका बदलणार नाही.
शेतकऱ्यांनी हट्ट सोडावा, आम्ही सन्मानाने चर्चा करू :
बावनकुळे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या मुळावर उठून काहीही होणार नाही. आम्ही त्यांना ऑफर देऊ, त्यांनीही ऑफर द्यावी. चर्चा टेबलावर होईल आणि तिढा सुटेल.” त्यांनी स्पष्ट केले की, पुरंदर विमानतळ (purandar Airport) हा पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा माल निर्यात करता येणार आहे. सात गावांतील नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन आम्ही सर्वेक्षण थांबवले आहे आणि पुढील १५ दिवसांत पुन्हा संवाद साधण्यात येईल.
शेतकऱ्यांना उद्देशून बावनकुळे (Bawankule) म्हणाले की, “तुम्हाला जमीन द्यायची नसेल तरी सरकारला ती हवी आहे. तुमच्या मागण्या आम्हाला सात दिवसांत कळवा.” त्यांनी सांगितले की, सरकार अशा प्रकारची योजना आणेल की शेतकऱ्यांना भरपूर लाभ होईल आणि त्यांना ‘सरकारने चांगले दिले’ असे वाटेल. भूसंपादनाच्या विरोधात असलेल्या लोकांशी चर्चा सुरू असून, गुन्हे दाखल झालेल्या शेतकऱ्यांविषयीही फेरविचार केला जाईल.
Purandar Airport l शेतीच्या हक्कासाठी सरकार सज्ज, पण प्रकल्पही गरजेचा :
घटनेनंतर पोलिस व ग्रामस्थांमध्ये झालेली झटापट आणि गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने अशा लोकांचा वेगळा विचार करण्याचे आश्वासन दिले आहे जे निष्पाप आहेत. “सरकार शेतीच्या हक्कासाठीही सज्ज आहे, पण विमानतळाचा प्रकल्प महाराष्ट्राच्या भविष्यासाठी गरजेचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रसंगी बोलताना बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, “काँग्रेसच्या नेतृत्वाखाली केंद्रात काही नाही आणि राज्यातही दिशा नाही.” रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यासह काही कार्यकर्ते पक्षांतर करत असल्याचे उदाहरण देत त्यांनी भाजपची दारे सक्षम लोकांसाठी उघडी असल्याचेही नमूद केले.