नवी दिल्ली | 5 वर्षाच्या तुमच्या अकार्यक्षम आणि अहंकारी कारभारामुळं शेतकऱ्यांचं जीवन उद्धवस्त झालं, अशी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत गरीब शेतकऱ्यांना 6000 रुपये अनुदान देण्याच्या निर्णयावर राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
शेतकऱ्यांना दिवसाला 17 रुपये देणं हा शेतकरी आणि त्यांच्या कामाचा अपमान आहे, असं देखील राहुल गांधींनी म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी हा अर्थसंकल्प नसून निवडणुकीचा जाहीरनामा आहे, अशी टीका केली आहे.
Dear NoMo,
5 years of your incompetence and arrogance has destroyed the lives of our farmers.
Giving them Rs. 17 a day is an insult to everything they stand and work for. #AakhriJumlaBudget
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 1, 2019
महत्वाच्या बातम्या-
–गरीबांची एवढी थट्टा-मस्करी कोणत्याच सरकारनं केली नव्हती- जितेंद्र आव्हाड
–मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे वाचा एकाच ठिकाणी
…आणि भाजप खासदारांनी संसदेत सुरु केला ‘मोदी मोदी’चा जयघोष
-दादर मेट्रो स्थानकाला ‘शिवसेना भवन’ नाव द्या- शिवसेना
–नव्या घोषणांच्या जाहिरातबाजीला जनता भुलणार नाही- अजित पवार