Rahul Gandhi l आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते अन् काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परभणी घटनेतील पीडीत कुटुंबियांची भेट घेतली. मात्र यानंतर राहुल गांधी यांनी राज्य सरकारवर टीका केली. यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला नाही तर त्यांची पोलिसांनीच हत्या केली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
… तर त्यांचा खून करण्यात आला :
परभणी घटनेतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी राहुल गांधी यांनी भेट देऊन चर्चा केली. मात्र त्या भेटीनंतर राहुल गांधी म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी यांचा शवविच्छेदन मी अहवाल पाहिला आहे. तसेच त्यांचे व्हिडिओ, फोटोग्रॉफ देखील पहिले आहे. मात्र ते पहिल्यावर शंभर टक्के सांगतो त्यांचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला आहे. तसेच त्यांना कोणताही आजार नव्हता. मात्र आता त्यांच्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जे वक्तव्य केले ते खोटे असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.
याशिवाय सोमनाथ सूर्यवंशी हा दलित आहे. तसेच ते संविधानाचे संरक्षण करत होते. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ही संविधान संपवण्याची आहे. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांना मारण्यात आले आहे. त्यामुळे आता मी या घटनेला मी त्यांचा खून करण्यात आला आहे असं म्हणणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
Rahul Gandhi l या घटनेला मुख्यमंत्री जबाबदार? :
या धक्कादायक घटनेत ज्या लोकांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना मारलं आहे, त्यांना मात्र शिक्षा मिळावी. तसेच या घटने संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे ते ही या घटनेस जबाबदार असणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पोलिसांना वाचवण्यासाठी खोटे बोलले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी हे राजकीय हेतूने आले आहेत. केवळ द्वेष निर्माण करण्याचा त्यांचा हेतू असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.
News Title : Rahul Gandhi Statement On Somnath Suryawanshi
महत्वाच्या बातम्या –
“एकनाथ खडसे अन् माझे प्रेम आधीपासूनचं”; त्यामुळेच आम्ही… भाजप नेते असं का म्हणाले?
शरद पवारांच्या ‘या’ आमदाराने घेतली अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
सरपंच हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींना ‘या’ तारखेपर्यंत अटक होणार? शिवसेना नेत्यानी दिली माहिती
वाल्मिकी कराडवर 23 गुन्हे, गुन्ह्यांची यादी मुख्यमंत्र्यांकडे देणार; सामाजिक कार्यकर्त्या आक्रमक
नाराज भुजबळ थेट भाजपाच्या वाटेवर?, CM फडणवीसांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण