मुंबई, कोकणसह राज्यातील ‘या’ भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

Weather Update

Rain Update | मुंबईसह कोकणभागात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा येथे पावसाने धुमाकूळ घातला आहे. तसेच कोकणातील रायगड रत्नागिरी येथे पावसाने धुमशान मचावली आहे. हवामान विभागाने या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलं आहे. मुंबईसह ठाणे येथे मुसळधार पाऊस होत आहे. (Rain Update)

पश्चिम महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसाने थैमान घातलं आहे. हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी ‘या’ समुद्रकिनारी असलेल्या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये डोंगराळ भागात अतिमुसळधार तर मैदानीभागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. (Rain Update)

मुंबईत गेल्या काही तासांपासून 40 ते 55 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच पालघरमध्ये देखील पावसाची अशीच परिस्थिती आहे. दरम्यान पावसाला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे पालघरमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात भात शेतीला शेतकरी अधिक प्राधान्य देतात. यामुळे भात पेरणीसाठी शेतीच्या कामाला यंदाच्या पावसाचा सकारात्मक परिणाम होईल. यामुळे पालघरच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. (Rain Update)

तसेच कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी नाले तुटूंब भरले असून दुथडी भरून वाहत आहेत. तसेच धरण क्षेत्राच्या पाणी साठ्यातही मोठी वाढ होताना दिसत आहे. जर असाच पाऊस सुरू राहिल्यास धरण तुडुंब भरण्याची शक्यता आहे. (Rain Update)

पुणे जिल्ह्यातही पावसाची बॅटिंग

दरम्यान सातारा, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी येथे पावसाने जोरदार बॅटिंग केल्यानंतर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भोर, वेल्हा, भागात 100 मिलीमीटरच्या वर पाऊस झाला आहे. तसेच पुण्यातील मावळ आणि भिमाशंकर परिसरात 200 मिलिमीटरवर पावसाची नोंद झाली आहे.

News Title – Rain Update Mumbai And Maharashtra Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा घटस्फोट निश्चित?, सोशल मीडियावर तो व्हिडीओ व्हायरल

माझी लाडकी बहीण योजनेत नव्याने पाच मोठे बदल, अर्ज भरण्यापूर्वी एकदा वाचून घ्या!

इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तो दिवस आता ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित!

बाहेर पडताना काळजी घ्या! राज्यात ‘या’ भागात आज अतिवृष्टीचा इशारा

“संविधानावर खरंच प्रेम असेल, तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींनी मनुस्मृती जाळावी”

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .