मुंबई | निर्णय का घेतले जात नाहीत? कशासाठी हे सरकार कुंथत आहे? कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीये.
राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन वीज बिलासंदर्भात चर्चा केली. राज्यपालांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
या संदर्भात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशीही बोलणं झालं. लवकरात लवकर निर्णय घेऊ असं ते म्हणाले. हा विषय आज राज्यपालांच्या कानावर टाकला. त्यावर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला दिल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय.
वीज बिलासंदर्भात मला वेळ पडली तर मी शरद पवारांना भेटेन, मुख्यमंत्र्यांनाही मी भेटेन, असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोरोना लसीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘मतदान बोटाने नाही तर…’; सोनू सूदचा बिहारच्या लोकांना मोलाचा सल्ला
‘…म्हणून पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केली’; पाकिस्तानी मंत्र्याच्या खुलासा
खळबळजनक! मनसे नेत्याची तलवारीने वार करून हत्या
Comments are closed.