“हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांचा थरकाप उडावा अशी…”; पहलगाम हल्ल्यावर राज ठाकरे संतापले

Raj Thackeray on Pahalgam Terror Attack

Pahalgam Terror Attack | काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या भ्याड हल्ल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे कडक कारवाईची मागणी करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. (Pahalgam Terror Attack)

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या हल्ल्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, केंद्र सरकारने हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करावा की त्यांच्या पुढच्या 10 पिढ्यांचाही थरकाप उडायला हवा. त्यांनी इस्रायलच्या 1972 मधील म्युनिक ऑलिम्पिकच्या संदर्भाचा उल्लेख करत सांगितले की, इस्रायलने त्या अतिरेक्यांवर जशी निर्दय कारवाई केली, तशीच ठोस आणि अंतिम कारवाई भारत सरकारने करावी.”

त्यांनी लिहिले की, “भारत आणि इस्रायल यांचे संबंध चांगले आहेत. भारत सरकारने त्यांच्याच मार्गावर चालत हल्लेखोरांना आणि त्यांच्या आधारस्तंभांना कायमचं संपवावं.” यासोबतच त्यांनी हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत सरकारच्या कारवाईला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं.

राज ठाकरे यांची पोस्ट

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली… ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा… १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला… यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना, या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत… केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्याना कायमच संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

मनसेचा सरकारला पाठिंबा-

या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली… एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याच्या धर्म विचारला… ही तुमची मुजोरी ? मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ… या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे… (Pahalgam Terror Attack)

केंद्र सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल ? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी…. हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये… आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल.

Title :  Raj Thackeray Demands Israel-Style Retaliation on Pahalgam Terror Attack

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .