पुणे | एक अत्यंत घाणेरडा पंतप्रधान आपल्या देशाला लाभला, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांच्याबद्दल त्यांनी हे उद्गार काढले.
मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पुण्यातील भाषणात सविस्तर भाष्य केलं. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्यामुळे देशातील जातीव्यवस्था पुन्हा बळकट झाली, असा आरोप त्यांनी केला.
आरक्षण आर्थिक निकषांवर असायला हवे, जातीय नव्हे, असं ते यावेळी म्हणाले. काकासाहेब शिंदेसारखे नाहक बळी पडू नका, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्रात मांडा; राजनाथ सिंहांचा मुख्यमंत्र्यांना आदेश
-राम मंदिराच्या विटांचं काय झालं?; राज ठाकरेंचा भाजपला सवाल
-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्रात मांडा; राजनाथ सिंहांचा मुख्यमंत्र्यांना आदेश
-मराठा आरक्षणासाठी चक्क दलित आमदाराचा राजीनामा!
-मराठा आरक्षणासाठी साताऱ्यातील पहिला राजीनामा…