मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरुन निघालेल्या मोर्चावर टीका केली आहे. मुस्लिमांनी काढलेल्या मोर्चाचा अर्थच लागला नाही, असं ते म्हणाले आहेत.
मोर्चाला उत्तर मी मोर्चानेच दिलं आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना बाहेर हाकला ही आमची मागणी आहे. ज्यांना कायद्याचे पूर्ण ज्ञान नाही असे लोकही या कायद्याबाबत बोलताना दिसतात, असं म्हणत राज ठाकरे यांनी टीका केली.
भारत हा काही धर्मशाळा नाही. कोणीही यावं आणि इथे रहावं. घुसखोरांना बाहेर हाकलंच पाहिजे. घुसखोरीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
पाकमधल्या हिंदूंवर अत्याचार होतात. त्यामुळे सीएएला विरोध करण्यात काही अर्थ नाही. 1955 पासून नागरिकत्व देण्याबाबत कायदा आहे, असंही ते म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
“काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत सत्ता चालवणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये”
गोडसेला श्रद्धांजली वाहण्यासाठी गांधींना शिव्या घालण्याची गरज नाही- संजय राऊत
महत्वाच्या बातम्या-
सरकारमधून बाहेर पडा म्हणणाऱ्या अब्दूल सत्तारांना बच्चू कडूंचं जोरदार प्रत्युत्तर
…तर राज ठाकरेंच्या मोर्चाला आमचं समर्थन असेल- राजू शेट्टी
“केजरीवालांचा पराभव होणार, असं झालं नाही तर पुन्हा कधीच निवडणूक लढवणार नाही”
Comments are closed.