मुंबई | राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. सध्याचे रुग्ण, संशयित रुग्ण आणि कोरोनाच्या चाचण्यासंदर्भात त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. तसेच इतर अनेक मुद्द्यावर देखील त्यांनी भाष्य केलं. त्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-
-कोरोनाचा मृत्यूदर सध्या कमी आहे, मात्र संसर्गदर जास्त आहे
-कुणीही घाबरुन जाऊ नका, काळजी घ्यावी
-महाराष्ट्रात कोरोनाचे ३२ रुग्ण, कुणाचीही प्रकृत गंभीर नाही
-१८ बाहेरुन संसर्ग होऊन आलेले आहेत, तर १४ जणांना त्यांच्यापासून संसर्ग झाला आहे
-केंद्र तसेच राज्य सरकारने ठरवून दिलेल्या प्रयोगशाळांमध्येच कोरोनाची चाचणी करावी
-सध्या कोरोनाचे ७५ रुग्ण संशयित आहेत
-सात देशांमधून परतणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे
-रुग्ण पळून जाऊ नयेत म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे
-जे रुग्ण विलगीकरण मान्य करणार नाही, त्यांना स्थानबद्ध केलं जाणार
-कोरोनाबद्दल अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार
-कोरोनाची नियमावली न पाळणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार
-रुग्णांना जेवण, टीव्ही, वायफाय सेवा देण्याचा प्रयत्न
-मुंबईच्या सेव्हन हिल्स भागात १ हजार बेडची व्यवस्था करणार
-कस्तुरबा गांधी रुग्णालयात १४५ बेडची व्यवस्था करणार
-मिरज, सोलापूर, धुळे, औरंगाबादमध्ये कोरोना तपासणी लॅब सुरु करणार
-गर्दी वाढू नये यासाठी जमावबंदीचे आदेश
संबंधित बातम्या-
पुण्यात जमावबंदी लागू करण्याचा विचार- डॉ. दीपक म्हैसेकर
Coronavirus | आईची काळजी मिटावी म्हणून पिंपरीत शिकणारा मुलगा घरी परतला
महत्त्वाच्या बातम्या-
मध्य प्रदेशनंतर आता गुजरात काँग्रेसला झटका; काँग्रेसचे 7 आमदार बेपत्ता
फारुक अब्दुल्लांच्या सुटकेमागे कोण? रॉच्या माजी प्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लागू
Comments are closed.