मुंबई | दूध आंदोलकांनी कायदा हातात न घेता शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं आहे.
आपल्या जनावरांसोबत रस्त्यावर उतरले आहात त्यामुळे त्यांची काळजी घ्या. पोलिसांनी आतताईपणा केला तर आंदोलनासाठी आमची जनावरं जबाबदार आहेत. त्यांना अटक करा, अशी भूमिका घ्या, असं अावाहन त्यांनी केलं आहे.
दरम्यान, आंदोलनादरम्यान कोठेही कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल, असं वर्तन करू नका, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांनी पार वाट लावली- राज ठाकरे
-डोंबिवलीचे रस्ते बनवताना खडीसोबत डांबराऐवजी साखर वापरली!
-दूध दरवाढ आंदोलन चिघळलं; कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड
-परळीत मराठ्यांचा रात्रभर ठिय्या; अजूनही आंदोलन सुरूच
-विराट कोहलीच्या ‘त्या’ निर्णयावर व्हीव्हीएस लक्ष्मण भडकला!