कोल्हापूर | सोलापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी(Raju Shetty) यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
शिवसेना आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरु आहे. याबाबत तुमचं मत काय असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सत्ताधारी गटातील एकही आमदार (Mla) दारात उभा करण्याच्या लायकीचा नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन वेळा भेटलो. पण काहीही उपयोग झाला नाही. कारखान्याच्या गोदामातील साखरदेखील बाहेर येऊन देणार नाही.कोल्हापुरात साखर अडवली जाऊ लागली आहे. आता आम्ही रस्त्यावरच्या लढाईला सुरुवात करणार आहोत. शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा येणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत वापरु देणार नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.
आम्ही कुणाच्या ही भानगडीत न पडत नाही. शेतकऱ्यांसाठी काम करतो. येत्या काळातही शेतकऱ्यांची बाजू मांडणारे लोकप्रतिनिधी तयार करण्याचा आमचा मानस आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या निवडणुकीत बदल घडवेल. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे लोकप्रतिनिधी तयार करेन, असंही त्यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या-
- सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती
- नांदेडमधील घटना गांभीर्याने घेतली, चौकशी करून कारवाई करणार- एकनाथ शिंदे
- अजित पवार नाराज?; हे कारण आलं समोर
- निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ‘या’ लोकांना राजकारणात नो एन्ट्री
- “एकनाथ शिंदे, थोडी जरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या”