मुंबई | दूध दरवाढीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणखी आक्रमक होणार आहे. उद्यापासून रस्त्यावर जनावरं घेऊन महामार्ग रोेखणार असल्याचा इशारा खासदार राजू शेट्टींनी दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरू केलेल्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. मुंबईत होणारा दुधाचा पुरवठा रोखण्याचंं काम संघटना करत आहे.
दरम्यान, सरकारला आणखी कोंडीत पकडण्यासाठी रस्त्यावर जनावरं आणून महामार्ग रोखण्यात येणार आहे. तसंच मुलं-बाळं, महिलांना घेऊन पोलिस स्टेशनमध्ये जाऊन बसण्याचा इशाराही शेट्टींनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-दूध आंदोलनाकडे हार्दिकने फिरवली पाठ; राजू शेट्टींना रस्त्यावर खुर्ची टाकून बसण्याची वेळ!
-सांगलीत पोलिसाला 18 वेळा भोसकलं, घटना सीसीटीव्हीत कैद
-दूध दरवाढीवरुन नगरच्या शेतकऱ्यानं महादेव जानकरांना शिव्या दिल्या!
-भाजप दहा तोंडी रावण आहे; विद्या चव्हाण यांचा भाजपवर हल्लाबोल!
-आता भाजपला शिवाजी महाराज भलते वाटायला लागले आहेत- जयंत पाटील