नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी हे देशाच्या पंतप्रधानांना काठीने मारायची भाषा करत असतील तर आम्ही त्यांना अंडी फेकून मारू, असं वक्तव्य ‘रिपाई’चे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राहुल गांधी पंतप्रधानांना काठीने मारायची भाषा करतात त्यामुळेच त्यांच्या अशाच वक्तव्यांमुळे अमेठी लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी यांचा पराभव झाला. राहुल गांधी हे काँग्रेस पक्ष पोखरत आहेत. त्यामुळे काँग्रेस नष्ट होईल, असं म्हणत रामदास आठवले यांनी गांधींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी नोकऱ्या मिळाल्या नाहीत तर पुढच्या सहा महिन्यांमध्ये देशातले तरुण पंतप्रधान मोदींना काठीने मारतील, असं वक्तव्य केलं होतं. साहजिकच यावरून भाजपचे नेते प्रचंड आक्रमक झाले होते. यावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं.
दरम्यान, माझ्या पाठीवरील प्रत्येक काठीचा वार सहन करण्याची ताकद मिळेल, असं मोदींनी म्हटलं होतं. मोदींच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला होता.
राहुल गांधी के डंडा मारने वाले बयान पर केंद्रीय मंत्री रामदास अठावले: राहुल गांधी अगर प्रधानमंत्री को डंडा मारेंगे तो हम उनको अंडा मारेंगे। ऐसी बयानबाज़ी करते-करते राहुल गांधी अमेठी में हार गए। राहुल गांधी कांग्रेस पार्टी को खोखला कर रहे हैं,वो कांग्रेस पार्टी को नष्ट कर रहे हैं। pic.twitter.com/ZCO5Qbvbev
— ANI_HindiNews (@AHindinews) February 8, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“शरद पवार सिर्फ नामही काफी है, पवारांपुढे दिल्लीलाही झुकावं लागतं”
आधीच्या सरकारने शिक्षणाच्या आयचा घो केला- संजय राऊत
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.