…म्हणून राज ठाकरे मास्क घालत नसतील- रामदास आठवले
सातारा | कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे मास्क न घालण्याचं आवाहन करत आहेत. या आवाहनामुळे राज ठाकरेंवर औरंगाबादच्या एका वकिलाने तक्रार दाखल केली आहे. कोरोना वाढत चालला असताना राज ठाकरे अशा प्रकाराचं आवाहन कशामुळे करत असतील?, असा सवाल प्रत्येकाला पडला असेल. अशातच यावर आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात मास्क न वापरणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर जशी कारवाई होते, त्या पद्धतीने नेत्यावर देखील झाली पाहिजे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. साताऱ्यामध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज ठाकरेंनी सरकारने दिलेले आदेश पाळले पाहिजेत. पण कदाचित राज ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश पाळायचा नसेल त्यामुळे ते मुद्दाम मास्क वापरत नसतील, अशी उपरोधिक टीका रामदास आठवले यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा दावा केला आहे. अंबानी प्रकरणाकडे संशयाने पाहत आहे. स्फोटकांच्या गाडीच्या मालकाचा मृत्यू संशयास्पद झाला आहे. ती आत्महत्या असा दावा पोलिसांनी केला आहे मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं रामदास आठवले म्हणाले.
दरम्यान, औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात मास्क न घालण्याच्या आवाहनामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला, असा तर्क लावत वकील रत्नाकर चौरे यांनी तक्रार दाखल केली आहे.
थोडक्यात बातम्या-
#Corona पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी
राज्यातील ‘हा’ जिल्हा प्रत्येक शनिवार, रविवार राहणार पूर्ण बंद
“मी कधीही विचार केला नव्हता की देशातील सर्वात मोठ्या नेत्यासोबत बसायला मिळेल”
राज ठाकरेंच्या पत्रानंतर ‘नाणार’वासीय म्हणतात; ‘गुजराती मारवाड्यांच्या गुंतवणुकीत अडकलेला पैसा….’
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘या’ तारखेला अन्नत्याग आणि पदयात्रा
Comments are closed.