परभणी | केंद्रीय मंत्री व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुढील दोन तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार असेल, असा दावा केला आहे.
रावसाहेब दानवे हे परभणी येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
कार्यकर्त्यांनी असा विचार करू नये की, आपण राज्यात सरकार स्थापन करू शकत नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात राज्यात आपलं सरकार स्थापन झालेलं असेल आणि तुम्ही सगळे माझं म्हणणं लक्षात ठेवा, असं दानवे म्हणालेत.
राज्यात सरकार कसं स्थापन होईल, हे मी आता सांगणार नाही. मात्र, सरकार स्थापन झाल्यावर आपण महाविकास आघाडीला हे सांगू, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला मोठा धक्का; रोहित-इशांत शर्मा पहिल्या 2 कसोटी सामन्यांमधून बाहेर
…तर ती कोणती मर्दानगी होती?- प्रवीण दरेकर
ठाण्यातील शिवसेनेच्या आमदार, खासदारांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले; निलेश राणेंचा आरोप
‘आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही, नोटीसा कसल्या पाठवता, घरी या’; संजय राऊत
प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत- नारायण राण