रेशन कार्डधारकांनो लक्ष द्या! फक्त 24 तास शिल्लक, अन्यथा कार्ड होणार ब्लॉक!

Ration Update

Ration Card | राज्यातील लाखो रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिधापत्रिकेस आधार क्रमांक संलग्न करून त्यावरील नावाची पडताळणी करण्याची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने दिलेली अंतिम मुदत उद्या – 30 एप्रिल 2025 आहे. यानंतर ही प्रक्रिया न केल्यास संबंधित लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिकेतून वगळली जातील आणि त्यांना राशन मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्य सरकारने दिला आहे. (Ration Card)

काय आहे ई-केवायसी प्रक्रिया? :

राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. ही प्रक्रिया एकदाच करावी लागते आणि ती वेळेत पूर्ण झाली नाही तर शिधापत्रिका बंद होण्याचा धोका आहे.

Ration Card | ई-केवायसी करण्याचे 3 मार्ग:

रास्त भाव दुकानावर (Ration Shop) : रेशन कार्ड व आधार कार्ड घेऊन आपल्या दुकानावर जा, त्यानंतर बायोमेट्रिक मशीनवर अंगठ्याचा ठसा द्या. तसेच तुमची ई-केवायसी लगेच पूर्ण होईल.

Mera KYC App द्वारे (मोबाईल अ‍ॅप) : सर्वात प्रथम Google Play Store किंवा Apple App Store वरून “Mera KYC” अ‍ॅप डाउनलोड करा. रेशन कार्ड आणि आधार क्रमांक भरून ओटीपी व्हेरिफिकेशन करा. गरज भासल्यास जवळच्या सेवा केंद्रावर बायोमेट्रिक पडताळणी करा

महा ई-सेवा केंद्र / CSC केंद्रावर : जवळच्या CSC किंवा महा ई-सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक व आधार पडताळणीसह ई-केवायसी पूर्ण करा.

काय काळजी घ्याल? :

– आधार आणि रेशन कार्डवरील नावामध्ये कोणतीही विसंगती असल्यास ती तात्काळ सुधारावी
– ई-केवायसी वेळेत पूर्ण केली नाही तर शिधा थांबू शकतो
– प्रक्रिया यशस्वी झाल्यावर पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही

News Title: Ration Card e-KYC Deadline April 30: Last Day to Link Aadhaar or Lose Benefits

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .