बारामती | मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या टर्ममधील दुसरा अर्थसंकल्प काल लोकसभेत सादर केला. यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी जोरदार टीका केली. याचदरम्यान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही आज फेसबूक पोस्ट करत केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे.
शून्याचा शोध आर्यभट्टेने लावला हा इतिहास आहे त्याचप्रमाणे लोकांच्या हाती शून्य देण्याचा इतिहास भाजपच्या नावाने जोडला जाईल, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
लोककल्याणकारी योजनांचं बजेट कमी करु वाटतं यातून गरिबांबद्दल सरकार काय विचार करत आहे ते लक्षात येईल. छोट्या गुंतवणूकदारांना बजेटमध्ये काय देण्यात आलं तर शून्य सोडून काही राहत नाही, असं रोहित पवार म्हटलं आहे.
दरम्यान, शिक्षणक्षेत्रात रोजगार निर्मीती करण्यावर, सध्याच्या बेरोजगारीवर भाष्य करण्यात आलेले नाही. तरुणांच्या तोंडाला अप्रेंटिशीपची पाने पुसली आहेत. आरोग्यासाठीच्या निधीत कपात केली आहे. कृषीचा विकास दर निच्चांकी असून त्याबाबत भरीव उपायोजना नाहीत, असंही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“प्रत्येक सरकार मराठा समाजातील मुलामुलींसाठी जागा भरण्याच्या घोषणा करतायेत”
लोणीकर, तुमच्यासारख्या व्हिलनचा सुपडा साफ करायला वेळ लागणार नाही- रुपाली चाकणकर
महत्वाच्या बातम्या-
देशाचं विभाजन करत असलेलं राजकारण थांबवा- सोनम कपूर
तहसीलदारबाई हिरोईनसारख्या दिसतात म्हणणाऱ्या लोणीकरांची सारवासारव, म्हणतात…
विश्व हिंदू महासभेच्या नेत्याची डोक्यात गोळ्या घालून हत्या!
Comments are closed.