मुंबई | महाविकास आघाडी सरकारने दखल घेत आज जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा घेतलेला निर्णय योग्य असून काँग्रेस पक्ष याचे स्वागत करत आहे, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
मी लाभार्थी’ या खोट्या जाहिरातींवर शेकडो कोटी रूपयांची उधळण करण्यात आली. ही योजनात फेल गेली आहे. राज्यातील जनतेच्या करोडो रुपयांची उधळण झाली आहे तो पैसा आता वसूल झाला पाहिजे, असं सचिन सावंत यांनी सांगितलंय.
आघाडी सरकारने आज एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून या चौकशीतून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असंही सावंत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ, दुसऱ्यांदा हक्कभंग दाखल
…तर तुम्हाला तोंड लपवायला जागा ठेवणार नाही; सेनेचा अमृता फडणवीसांना इशारा
खळबळजनक! अशिष शेलार यांच्यानंतर आता भाजपच्या ‘या’ नेत्याला धमकीचे फोन
“आजच्या आनंदीबाईनी त्यांच्या राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून, वेळीच….”