Sadabhau Khot | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वांचं लक्ष आता मंत्रीमंडळ विस्तारकडे लागलं आहे. तसेच यात तिन्ही पक्षातील कोणत्या नेत्यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार, कुणाला किती पदे मिळणार?याकडेही अनेकांचं लक्ष लागलं आहे. अशात महायुतीमधील एका बड्या नेत्याने (Sadabhau Khot) केलेल्या मागणीची चर्चा रंगली आहे.
रयत क्रांती संघटनेचे प्रमुख तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या नेत्यांकडे मोठी मागणी केली आहे. ‘मोठ्या पक्षांची मंत्रिपदं नंतर निश्चित करा, आधी छोट्या घटक पक्षांची मंत्रीपदं निश्चित करा’, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. मीडियाशी संवाद साधतांना खोत यांनी हे वक्तव्य केलं.
सदाभाऊ खोत यांचं मोठं वक्तव्य
“आम्ही 2014 पासून महायुती बरोबर आहोत. आम्ही नक्कीच अनेक संकटांचा मुकाबला करत आलोत. त्यामुळे माझीही इच्छा आहे की, लढणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळावी. आम्ही प्रामाणिक काम केलं, आता पाहू ते काय निर्णय घेतात”, असं सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी म्हटलं आहे.
पुढे सदाभाऊ म्हणाले की, शिंदे यांच्या शिवसेनेचा खासदार आम्ही निवडून दिला.आता इकडे आम्ही भाजपाचे घटक पक्ष आहोत. माझा संघर्ष हा सत्तेसाठी नव्हता. माझा संघर्ष हा सर्वसामान्य माणसांना न्याय मिळावा यासाठी होता. आता मूठभर धान्य त्यांनी आमच्या सुपात टाकायचं की नाही? हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा आहे. या तिघांनी प्रथम घटक पक्षांची मंत्रिपदे बाजूला काढावी, मग मंत्रिपदाचे वाटप करावं, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
मंत्रीमंडळ विस्तार कधी?
दरम्यान, येत्या 11 डिसेंबरला महायुतीचा मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाला 10 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रिपदं दिली जाणार असल्याची देखील माहिती आहे. तसेच, अजित पवार गटाला किती खाती मिळणार तेही निश्चित झाल्याचं समजतंय. तर, भाजपाला सर्वाधिक जागांवर यश मिळाल्याने भाजपाला सर्वाधिक खाती मिळणार, अशी शक्यता आहे. (Sadabhau Khot)
News Title : Sadabhau Khot big demand to mahayuti
महत्वाच्या बातम्या-
आज दुर्गाष्टमीला देवी दुर्गा ‘या’ राशींना देणार सुख-समृद्धी, धनलाभाचे देखील संकेत
अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नव्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष!
मोठी बातमी! मागच्या सरकारमधील ‘या’ दोन मंत्र्यांचा पत्ता कट होणार?
‘त्या एका सीनसाठी 1 कोटी रुपये घेतले; माधुरीच्या गौप्यस्फोटाने सगळीकडे एकच चर्चा!
‘आम्हाला पण…’; रामदास आठवलेंच्या देवेंद्र फडणवीसांकडे मोठ्या मागण्या