सांगली | केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शांत, संयमी आंदोलनाने अचानक उग्र रुप धारण केलं. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष झाला.
या हिसांचारावर माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सांगलीमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
दिल्लीतील हिंसाचारात सामील असणारे शेतकरी नाहीत. ते देशद्रोही आहेत, अशी टीका माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
हिंसाचार उसळल्यानंतर शेतकऱ्यांच्या या मोर्चावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. अनेकांनी या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला.
थोडक्यात बातम्या-
कर्तृत्वाला मिळाली नशिबाची साथ; सर्वात कमी वयाचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा!
आशिष शेलार भाजप आणि संघाचे गुलाम- अमोल मिटकरी
“शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?”
आधी शिवसेनेत आणि नंतर राष्ट्रवादीचा प्रचार, पाटील आता काँग्रेसमध्ये दाखल!
भारतातील ‘या’ शहरात पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या पार