मुंबई | स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण केले. शिवसेनेने मुखपत्र सामनामधून मोदींच्या भाषणावर निशाणा साधला आहे.
भाषण करताना मोदींनी भगवा फेटा बांधला, हे कौतुकास्पद आहे. मात्र, याने हिंदुत्वाचे प्रश्न सुटणार आहेत का?, असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे. अयोध्येत राम मंदिराचे काय होणार? , यावर मोदींनी भाषण केले असते तर लाल किल्लाही रोमांचित झाला असता, असा टोमणाही शिवसेनेेनं मारला आहे.
दरम्यान, पुण्यात सुरू झालेले पगडीचे राजकारण आता दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पोहचले आहे. शिवाय मोदी यंदा भाषणात काय बोलणार याची फार उत्सुकता नव्हती, असा टोलाही अग्रलेखातून शिसेनेनं लागावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-धक्कादायक!!! हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा डाव होता?
-माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर; व्हेंटिलेटरवर ठेवल्याची माहिती
-शरद पवारांवर टीका केल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा राडा
-राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचे अनुकरण करायला हवे- राष्ट्रपती
-अॅट्रॉसिटीच्या खटल्यात नारायण राणेंना तात्पुरता दिलासा!