अहमदनगर | केडगावमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रातून आमदार संग्राम जगतापांचं नाव वगळण्यात आलं आहे. सीआयडीकडून जिल्हा सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
10 आरोपींपैकी 8 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. संग्राम जगताप आणि बाळासाहेब कोतकर यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र आरोपपत्रात दोघांचं नाव नसलं तरी पुरवणी दोषारोपपत्रावर त्यांचं भवितव्य ठरणार आहे.
दरम्यान, केडगावमधील शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी संग्राम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
-धक्कादायक!!! विधानभवनाच्या गटारीत सापडल्या बियर आणि दारूच्या बाटल्या!
-अमित शहांच्या कार्यक्रमात खाण्याच्या पॅकेटवरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
-जे संसार करत नाहीत त्यांना जगाचा संसार चांगला करता येतो- जानकर
-मुख्यमंत्र्यांच्या अट्टाहासामुळेच अधिवेशनाचं कामकाज खोळंबलं- धनंजय मुंडे
-गोपाळ शेट्टी पक्षावर नाराज? खासदारकीचा राजीनामा देणार???
Comments are closed.