“खोके सरकारला शेख हसीना यांच्यासारखं पळवून..”; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut on Mahayuti Govt 

Sanjay Raut | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज (9 ऑगस्ट) महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी दिल्लीतील कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान काय रणनीती ठरली याबाबत सर्व माहिती राऊत यांनी दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातून खोके सरकारला घालवायचंय, असं म्हटलं. तसंच दिल्लीतील बैठकीत नेमकं काय ठरलं, यासंदर्भात त्यांनी (Sanjay Raut ) खुलासा केला.

उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत मल्लिकार्जून खरगे, शरद पवार, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह इतर नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. महाविकास आघाडीचा 16 ऑगस्टला मेळावा आहे. उद्धव ठाकरे , शरद पवार राज्याचा दौरा करणार आहेत.राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात यावं, अशी चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

“खोके सरकार लोकशाही मार्गानं घालवणार”

“तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी असं ठरवलंय की सर्व निर्णय एकत्र बसून घ्यायचे, फार ओढाताण करायची नाही. कोणत्याही परिस्थिती राज्यातून खोके सरकार घालवायचं आहे, भाजपला राज्यातून हद्दपार करायचंय.”, असं संजय राऊत (Sanjay Raut )म्हणाले.

“महाराष्ट्रात जे घाणेरडं राजकारण सुरु झालंय, पैशाचं राजकारण असेल, विषारी राजकारण असेल त्याचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस, भाजप आणि अमित शाह आहेत.”, असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. यावेळी राऊत यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल देखील मोठं विधान केलं. जर लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हा चेहरा झाला असता तर भाजपचा अनेक जागांवर पराभव करता आला असता, असं राऊत म्हणाले.

“महाराष्ट्रात पैशाचं राजकारण करण्यामागे फडणवीस सूत्रधार”

या देशात मोदी शाह यांच्या अत्याचाराविरुद्ध , अन्यायाविरुद्ध कोणी आवाज उठवत नव्हते तेव्हा राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांचा चेहरा बनले असल्याचं देखील संजय राऊत (Sanjay Raut )म्हणाले आहेत.

तसंच महाराष्ट्रातील खोके सरकार शेख हसीना यांच्याप्रमाणं पळवून घालवायचं नाही तर लोकशाही मार्गानं घालवायचं असल्याचं संजय  राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी कुस्तीपटू विनेश फोगाटबद्दल देखील भाष्य केलं. भाजपचा साहित्य, कला क्रीडा याच्याशी संबंध आला असता तर, विनेश फोगाटचं पदक गेलं नसतं. विनेश फोगाटचं पदक घालवायला भाजप कारणीभूत आहे. तिचं पदक गेल्याने भारतीय जनता पक्षाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

News Title :  Sanjay Raut on Mahayuti Govt 

महत्त्वाच्या बातम्या-

नागपंचमी सणाला नागदेवतांची पूजा ‘या’ वेळेपर्यंत करा; मिळतील शुभ संकेत

नागदेवता या दोन राशींवर होणार प्रसन्न; मिळणार आनंदाची बातमी

कायम पैशांच्या मागे पळणं सोडा, आयुष्यात यश मिळवण्यासाठी ‘हे’ लक्षात ठेवा!

समंथाच्या एक्स नवऱ्याने उरकला साखरपुडा; होणाऱ्या सुनेबद्दल नागार्जुन म्हणाले, ‘खूप हॉट..’

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डंका!, मंत्री अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .