मुंबई | वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्यावर ठाम आहेत. हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने मंदिर प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र प्रकाश आंबेडकर यांची कृती नक्कीच भूषावह नसल्याचं सांगत त्यांच्याकडून कायदेभंगाची अपेक्षा नव्हती, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आरोग्यविषय आणीबाणी असताना आणि सगळं जग सोशल डिस्टन्सिंग पाळत असताना प्रकाश आंबेडकर यांच्याकडून अशी अपेक्षा नाहीये. प्रकाश आंबेडकर संयमी, जाणकार आणि कायद्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी कायदेभंगाचं पाऊल उचलायला नको होतं, असं राऊत म्हणाले आहेत.
आरोग्यविषयक जागतिक संकटात सगळ्यात प्रथम लोकांचा जीव वाचवणं महत्त्वाचं असतं. सरकारची प्राथमिकता देखील तिच असायला हवी. मात्र कोरोना सारख्या आजारात लोकांना एकत्र जमवून आंदोलन उभारणं, ही गोष्ट व्हायला नको होती, असं राऊत म्हणाले.
दुसरीकडे माझ्यावर कारवाई करा, मी नियम मोडण्यासाठी आलोय. गेली अनेक दिवस नागरिक मंदिरं उघडण्याची मागणी करत आहेत. पण सरकार त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करतंय. शेवटी राज्य आणि देश लोकांच्या मालकीचा आहे सरकारच्या नव्हे. सरकार चुकतं तेव्हा लोकच सरकारला सूचना देतात, आंदोलनं करतात. त्यामुळे आजच्या आंदोलनानंतर सरकार मंदिरं उघडण्याबाबत सकारात्मक असेल, अशी अपेक्षा आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सुशांत सिंह राजपूतच्या लीक झालेल्या ऑडिओ क्लिपने खळबळ!
“दारूप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर दारं उघडली असती”
सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी प्रशांत भूषण यांना 1 रूपयांचा दंड, रक्कम न भरल्यास…..
Comments are closed.