मुंबई | छत्रपती संभाजीराजे यांनी एमपीएससी परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आंदोलनाच व वेळ आल्यास तलवारी काढू, असा इशारा दिला होता. यानंतर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून संभाजीराजेंना सवाल केला आहे.
जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे. अशी भाषा करणारे राज्यातील तालेवार लोक आहेत. आता दसराही येत आहे. त्यामुळे शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्र नेमकी कोण काढतंय, शस्त्र कोणावर चालवली जातील, ते पाहावेच लागेल, असं शिवसेनेनं म्हटलंय.
कोल्हापूर आणि सातारचे ‘राजे’ मराठा आरक्षणात उतरले आहेत. त्यावर आंबेडकर यांनी एक वक्तव्य केलं. प्रश्न कोणी बिनडोक असण्याचा किंवा तलवारी चालवण्याचा नाही. जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही, असं शिवसेनेनं म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
…तर दिवाळीनंतरही शाळा सुरू करणं अशक्य- बच्चू कडू
“कोणताही धर्म आणि देव सणांसाठी जीव धोक्यात टाकायला सांगत नाही”
“आरेतील कारशेडचं ठिकाण बदलण्याचा निर्णय अहंकारातून”
तेवतिया आणि वॉर्नरमध्ये नेमकं काय झालं?; सोशल मीडियावर ‘हा’ व्हिडीओ व्हायरल