मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पूरग्रस्तांना जाहीर केलेल्या मदतीमध्ये सरकारने वाढ करावी, अशी प्रमुख मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना मागण्याचं निवेदन दिलं. पूरग्रस्तांच्या व्यथा आणि अडचणी त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
पूरग्रस्त भागातील बाधीत जनतेच्या मागण्यांकडे राज्यसरकारचे लक्ष वेधले. त्यास अनुसरून राज्यसरकारने काल मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काही धोरणात्मक निर्णय घेतल्याचे दिसून येते, अशी माहिती पवार यांनी दिली.
ज्याचे प्रमुख म्हणून संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही मांडलेल्या समस्या व सादर केलेल्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करून, निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी मुख्यमंत्री तातडीने उपाययोजना कराव्या अशी आम्ही अपेक्षा करतो, असं पवार म्हणाले.
मी केलेल्या जाहीर मागण्यांची दखल घेऊन राज्यसरकारने मंत्रीमंडळ उपसमिती बैठकीत हा विषय प्राधान्याने घेतला. मात्र काही मागण्या आंशिक स्वरूपात मान्य झाल्या असून त्यात त्रुटी राहिल्या आहेत. त्यामुळे पीडित जनतेने मांडलेल्या व्यथा व केलेल्या मागण्या या निवेदनाद्वारे विस्ताराने मांडल्या.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 20, 2019
कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मी जाहीर पत्रकार परिषद आयोजित करून पूरग्रस्त भागातील बाधीत जनतेच्या मागण्यांकडे राज्यसरकारचे लक्ष वेधले. त्यास अनुसरून राज्यसरकारने काल मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काही धोरणात्मक निर्णय घेतल्याचे दिसून येते.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 20, 2019
राज्याचे प्रमुख म्हणून संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही मांडलेल्या समस्या व सादर केलेल्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करून, निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी मुख्यमंत्री तातडीने उपाययोजना करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. pic.twitter.com/tsiEA8MDGC
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 20, 2019
महत्वाच्या बातम्या-
-भीक नको म्हणणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंना विनोद तावडे यांचं प्रत्युत्तर…!
-पी. चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
-सरकार आपल्या डोक्यावर मिरच्या वाटतंय- खासदार अमोल कोल्हे
-दानवेंच्या होम ग्राऊंडवर धनंजय मुंडेंची तोफ धडाडली; म्हणतात हे तर ‘खाऊसाहेब दानवे…!’
-शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर छगन भुजबळ म्हणतात…
Comments are closed.