Sharad Pawar | 4 जून रोजी म्हणजेच उद्या लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. निकाल लागण्यापूर्वीच राजकीय नेते मंडळी तसंच उमेदवार मोठे दावे करत आहेत. अशात शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खरमरीत पत्र लिहीत महत्वाचे मुद्दे सरकारपुढे मांडले आहेत.
शरद पवारांनी राज्यातील महत्वाच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांनी दुष्काळ स्थितीबाबत मोठी मागणी केली आहे. राज्यात दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत या भीषणतेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधूनही राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय.
दुष्काळाची स्थिती राज्यात कायम राहिली आणि जर राज्य सरकारकडून तातडीने पावलं उचलली गेली नाहीत तर, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा देखील यावेळी पवारांनी (Sharad Pawar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
शरद पवारांचं थेट पत्र
मी मागील महिन्यात दिनांक 24 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. सदर पत्रकार परिषदेते मी राज्य सरकारशी सहकार्य करण्याची आणि दुष्काळी परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याची भुमिका घेतली होती. आपण देखील आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला होता. परंतू ह्या महत्वपुर्ण बैठकीत संबंधित लोकप्रतिनिधी व मंत्री गैरहजर होते. आपण सदर बाबीची योग्य ती दखल घेतली असेलच. मात्र राज्य सरकार अद्यापही अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत नाही हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो, असं शरद पवारांनी (Sharad Pawar) पत्रात सांगितले.
“संपुर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळतोय”
मागील दहा दिवसांत दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. राज्यातील उजनी, जायकवाडी सारखी महत्वाची धरणे आटली आहेत. संपुर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. त्याची झळ लगतच्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भ विभागाला देखील बसली आहे. धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगांव, सोलापूर, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी तहानलेली आहे. मराठवाडयासह पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, कोरेगाव आणि सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी ह्या तालुक्यातील पाणी टंचाई परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचं पत्रात म्हटलंय.
“राज्यातील पशूधन धोक्यात आले आहे”
मागील वर्षी राज्यात केवळ अकराशे टँकर्स होते. आजमितीस ती संख्या 11 हजारांच्या वर गेली असून टँकर्ससाठी पाणी भरण्याचे स्त्रोत शोधावे लागत आहेत. जनावरांना चारा आणि पाणी मिळणे कठीण झाले असून राज्यातील पशूधन धोक्यात आले आहे. पाण्याअभावी फळबागांची परिस्थिती बिकट झाली असून राज्यशासनाने फळबागा वाचविण्यासाठी अद्याप काहीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही. दुष्काळ निवारणाच्या योजना तळागळापर्यंत (Sharad Pawar) पोहोचल्या नाहीत, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.
“..तर मला संघर्षाची भुमिका घ्यावी लागेल”
राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी नवीन काही उपाययोजना देखील हाती घेतल्या नाहीत. हे दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते. दुष्काळी परिस्थिती हाताळताना मी राज्य सरकारशी सातत्याने सहकार्याची भुमिका घेत आलो आहे. परंतू ह्या भीषण दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पाहून स्वस्थ राहणे कठीण झाले आहे. दुष्काळ निवारणाच्या कामात राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत असे मी आवाहन करतो. मात्र त्यानंतरही काही आश्वासक बदल न दिसल्यास मला संघर्षाची भुमिका घ्यावी लागेल, हे स्पष्टपणे नमूद करतो, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.
News Title – Sharad Pawar letter to CM Eknath Shinde
महत्त्वाच्या बातम्या-
“अपघाताच्या रात्री दारु..”; अल्पवयीन मुलाची धक्कादायक कबुली
लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच सर्वसामान्यांना मोठा झटका!
खरचं रविना टंडनने मद्यधुंद अवस्थेत वृद्धेला मारहाण केली? यासंदर्भात रवीना काय म्हणाली
उष्णतेपासून दिलासा मिळणार! हवामान विभागाकडून महत्वाची अपडेट
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद