Sharad Pawar | महाराष्ट्रातील राजकारणात एक महत्त्वाची घटना घडली आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील एकमेव आमदार बापू पठारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय तटस्थ आणि पक्षीय संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
भेटीमागचं कारण समोर-
बापू पठारे (Bapu Pathare) यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर, राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. शरद पवार यांच्या पक्षाला अलिकडच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या निराशाजनक प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अधिक महत्त्वाची ठरते.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत सर्वात वाईट प्रदर्शन केलं होतं, ज्यामुळे पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते निराश झाले आहेत.
पुण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाचे एकमेव आमदार म्हणून बापू पठारे यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या भेटीमुळे असं दिसतं की शरद पवार यांच्या नेतृत्वाविरुद्ध काही नेते असंतुष्ट असू शकतात. या भेटीचं कारण समोर सांगत बापू पठारे यांनी तातडीने स्पष्टीकरण दिलं आहे, अजित दादा यांच्या या भेटी दरम्यान मतदारसंघातील विविध कामासंदर्भात चर्चा केली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही, असा दावा बापू पठारे (Bapu Pathare) यांनी केला आहे.
पुण्यातील राजकीय घडामोडींवर प्रभाव-
अजित पवार यांचा पुण्यात राजकीय प्रभाव क्षेत्र मोठं आहे. ते उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असून, पुण्यातील राजकीय घडामोडींवर त्यांचा प्रभाव असतो. पुण्यातील दहापैकी पाच ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी, अशी थेट लढत झाली होती. त्यामध्ये पाचही जागा अजित पवार यांनी जिंकल्या. त्यामुळे अजित पवार यांनी आपणच पुणे जिल्ह्याचे दादा आहोत, हे दाखवून दिलं होतं.
News Title : sharad pawar MLA meets ajit pawar
महत्त्वाच्या बातम्या-
महसूलमंत्री अॅक्शनमोडमध्ये! वाळू माफीयांचे धाबे दणाणले
ऐन थंडीत पावसाचं सावट, शेतकऱ्यांची चिंता वाढली; पाहा कुठे-कुठे बरसणार?
‘या’ आठवड्यात ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार, पाहा सुट्ट्यांची यादी
अल्लू अर्जुनच्या घराच्या मोडतोडप्रकरणी वडिलांनी दिली पहिली प्रतिक्रिया!
महिलांची संक्रांत गोड होणार, जानेवारीतच मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे?