सातारा | शेती हवामानावर अवलंबून असल्याने सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा अखेरचा तोडगा नाही. कर्जमाफीमुळे नियमित कर्जदारांवर अन्याय होतो. शिवाय चुकीचा पायंडाही पडतो, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
सातारा जिल्ह्या बँकेच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
सध्या राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं एकत्रित सरकार आहे. सरकार तिघे चालवत असले तरी सर्व पक्षांमध्ये समन्वय आहे. राज्याच्या दृष्टीने हे चांगले दिशादर्शक आहे, असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान, सरकार अस्तित्वात येताच ठाकरे सरकारकडून 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्यात आली आहे. फडणवीस सरकारने आपल्या कार्यकाळात दिड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली होती.
ट्रेंडिंग बातम्या-
लोणीकर, तुमच्यासारख्या व्हिलनचा सुपडा साफ करायला वेळ लागणार नाही- रुपाली चाकणकर
“मुंबईकरांना 24 तास पाणी देऊ म्हणणाऱ्यांनी 24 तास बार उघडे केले, हे तर ठग्ज आँफ मुंबईकर!”
महत्वाच्या बातम्या-
देशाचं विभाजन करत असलेलं राजकारण थांबवा- सोनम कपूर
तहसीलदारबाई हिरोईनसारख्या दिसतात म्हणणाऱ्या लोणीकरांची सारवासारव, म्हणतात…
विश्व हिंदू महासभेच्या नेत्याची डोक्यात गोळ्या घालून हत्या!
Comments are closed.