मुंबई | काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. पक्ष सोडताना त्यांनी काँग्रेसमध्ये युवांना संधी मिळत नसल्याची टीका केली. यावरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी शिंदेंचा जोरदार समाचार घेतला आहे.
काँग्रेसमध्ये युवांना संधी मिळत नाही, ही शिंदेेंची टीका पटत नाही. काँग्रेसमध्ये नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे आणि भविष्य देखील आहे, अशा शब्दात त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
दुसरीकडे महाराष्ट्राने काळजी करू नये, असं म्हणताना भाजप नेत्यांना त्यांनी टोला लगावला. महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे यांचं सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ नक्की पूर्ण करेल यात मला शंका वाटत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मध्य प्रदेशमधलं सरकार अजून गेलेलं नाहीये. कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर लोकांचा विश्वास आहे. ते चमत्कार करू शकतात अस लोकांना वाटतं. आपण बघूया दोन दिवस काय होतं, असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातम्या-
मुख्यमंत्रिपद अजितदादाच सांभाळतात, खरे मुख्यमंत्री तर…- संदिप देशपांडे
महत्त्वाच्या बातम्या-
काळजी करू नका… मध्य प्रदेशसारखं महाराष्ट्रात काहीच होणार नाही- शरद पवार
मोदींच्या हातात भारताचं भविष्य सुरक्षित; भाजपमध्ये प्रवेश करताच ज्योतिरादित्य यांना साक्षात्कार
काँग्रेस सोडताना माझं मन अतिशय दु:खी आहे- ज्योतिरादित्य सिंधिया
Comments are closed.