Sharad Pawar | विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी (Sharad Pawar) आपली भूमिका मांडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांनी (Sharad Pawar) आपली भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी अजित पवारांच्या यशावर देखील भाष्य केलं आहे.
“हे अमान्य करण्याची गरज नाही”
अजितदादांच्या पक्षाला जादा जागा मिळाल्या यावर बोलताना शरद पवार म्हणाले की युगेंद्र पवार आणि अजित पवार यांची तुलना होऊ शकत नाही. अजितदादांच्या जागा जास्त आल्या आहेत. हे अमान्य करण्याची गरज नाही. पण राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे, हे महाराष्ट्राला माहीत असावं असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
प्रमुख नेत्यांनी खूप कष्ट केले तरीही हा निर्णय आला. त्यात लाडकी बहीण, धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न काही प्रवृतीने केला त्याचाही परिणाम झाला असावा. एक चर्चा केली जाते की, समाजातील काही घटकांनी मतदानात वेगळा दृष्टीकोण घेतला असं म्हणतात. ते मला माहीती नाही. आम्ही त्या खोलात जाणार आहोत.ओबीसीच्या मतदानाचा आम्ही अभ्यास करणार आहोत असेही शरद पवार यांनी सांगितले.
Sharad Pawar | लोकांनी दिलेल्या निर्णयाचा मी अभ्यास करेन- शरद पवार
शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे, त्यामुळे मी माझ्याकडे काही अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आतापर्यंतची जी व्यवस्था आहे, त्यावर भाष्य करत नाही. निर्णय लोकांनी दिला. त्याचा मी अभ्यास करेन, असं पवार म्हणाले.
ईव्हीएमबाबत मी काही सहकाऱ्यांचं मत मी ऐकलं. पण त्याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही. तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही. यापूर्वी कधी झालं नव्हतं असं पैशाचं वाटप झालं असं लोक सांगतात, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
पराभवानंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले ‘मी आता काय…’
“आयुष्यात छान गोष्ट घडली…”, प्राजक्ताने व्हिडीओ शेअर करत दिली गूड न्यूज
महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाची स्थापना होणार? कोण करणार
‘हा’ खेळाडू ठरला आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू!
महायुतीतील 6 नेत्यांना मिळणार विधानपरिषदेची संधी, कोणाला लागणार लॉटरी?