मुंबई | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने धडाकेबाज विजय मिळवला आहे. यानंतर सर्वच स्तरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
दमदार अशा विजयासाठी टीम इंडियाचं खूप अभिनंदन, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. अजिंक्य रहाणेच्या संघाने बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकून नवा इतिहास घडवला, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
गाबाच्या मैदानावर 32 वर्षांनी ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाचा सामना करायला भारतीय संघाने भाग पाडलं. पुन्हा एकदा साऱ्यांचं अभिनंदन, असं शरद पवार म्हणाले.
गाबा खेळपट्टीवर ३२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघाला थरारक कसोटी सामन्यात धूळ चारणाऱ्या भारतीय संघाचे मनपूर्वक अभिनंदन! अजिंक्य रहाणेच्या संघाने बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकून नवा इतिहास घडवला.#INDvAUS
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 19, 2021
थोडक्यात बातम्या-
‘घ्या निवडणुका, महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तर…’; भाजपचं शिवसेनेला ओपन चॅलेंज
पाकिस्तानला हवी भारतीय लस; पुण्यातील सीरमच्या लसीसाठी प्रयत्न सुरु!
उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया- शरद पवार
धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर 38 जणांचा लैंगिक अत्याचार
परळीतील विजयानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…