मुंबई | 10 दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नवे उपमुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर हे सरकार काही महिन्यांत पडेल, असा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे.
प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं असून शिंदे सरकारवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. आगामी काळात या सरकारकडून चांगली कामं होतील, असा विश्वास देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
सरकार कोसळणार हे सांगणं विरोधकांचं कामच असतं. त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची जोडी फेविकॉल पेक्षाही अधिक घट्ट आहे, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे.
दरम्यान, कुणाला कोणतं मंत्रिपद मिळतं याकडे लक्ष देत नसल्याचं बच्चू कडू म्हणाले. तर दिव्यांगांसाठी वेगळा भाग बनवून त्याचा चार्ज माझ्याकडे दिला तर त्यासाठी नक्कीच चांगलं काम करता येईल, अशी इच्छा देखील बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे.
थोडक्यात बातम्या-
‘योग्य वेळ पाहिली आणि…’, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
बिअर तुमच्या शरीरासाठी ठरू शकते वरदान; संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर!
‘…तर राजकारण सोडून घरी बसेन’; शंभूराज देसाई यांचं मोठं वक्तव्य
भाजपला लवकरच मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष?; ‘या’ नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा
Comments are closed.