Uday Samant l विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्याने पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे. अशातच 5 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी देखील पार पडला आहे. यावेलु भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र आता मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच आता यासंदर्भात शिवसेना नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उदय सामंत काय म्हणाले? :
महायुतीमधील कोणत्या नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. तसेच महायुतीमधील कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार यासंदर्भात शिवसेना नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसला तरी देखील मंत्रिमंडळ स्थापन झालं आहे.
कारण मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी जोमाने काम करत आहेत. तसेच येत्या 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मी मीडियाद्वारे ऐकली आहे. त्यामुळे14 तारखेला होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.
Uday Samant l कोणाला कोणतं खातं मिळेल? :
तसेच शिवसेनेतील कोणाला मंत्रिपद मिळणार याबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांना आहेत. त्यामुळे कोणाला कोणतं खातं मिळेल? हे देखील येत्या दोन दिवसांत तुम्हाला कळणारचं आहे. मात्र आता तोपर्यंत तुम्ही सस्पेन्स ठेवा.
याशिवाय राज्यातील गृहखातं हे एकनाथ शिंदेंना हवं आहे. मात्र आमच्या पक्षाला गृह खातं पाहिजे, पण अशा कुठल्याही खात्यासाठी चर्चा अडलेली नाही. त्यामुळे आता सन्मानपूर्वक मंत्रिपदाचे वाटप होईल असं देखील उदय सामतं यांनी म्हटलं आहे.
News Title : Shiv Sena leader Uday Samants reaction on cabinet expansion
महत्वाच्या बातम्या –
असली उंदर पवारसाहेब… पडळकर- खोतांच्या जहरी टीकेला ‘या’ नेत्याचं प्रत्युत्तर
100 शकुनी मेल्यानंतर शरद पवार जन्माला…; पडळकरांची पवारांवर एकेरी टीका
तिने ऑफिसमध्ये जे पाहिलं… राज कुंद्राबद्दल सर्वात मोठा खुलासा
‘..हा तर क्षत्रियांचा अपमान’; पुष्पा-2 च्या निर्मात्यांना थेट धमकी, नेमकं झालं काय?
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार
.