मुंबई | रविवारी राज्यातील राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जवळपास सर्वंच पक्षांनी जाहीर केली आहेत. शिवसेनेच्या दोन, भाजपच्या तीन तसेच राष्ट्रवादी, काँग्रेसने प्रत्येकी एक उमेदवार रिंगणाात उतरवला आहे. काँग्रेसकडून उत्तर प्रदेशातील नेते इमरान प्रतापगढी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसने इमरान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्याने अनेक काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा मोरारजी यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. आमची 18 वर्षांची तपश्चर्या इम्रान भाई समोर कमी पडली असणार, असं नगमा यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 2003 ला राज्यसभेची उमेदवारी देणार असल्याचे सांगितले होते. तेव्हा आम्ही सत्तेत नव्हतो. मात्र, त्यांच्या सांगण्यावरून मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, असं नगमा मोरारजी यांनी म्हटलं आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर 18 वर्षे उलटून गेली. मात्र, मला राज्यसभेवर पाठविण्याची संधी मिळालेली नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रेसकडे एकचं जागा होती. त्यामुळे कोणालाही उमेदवारी मिळाली असती तरी सगळ्यांचे समाधान झाले नसते, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. मुकूल वासनिक यांना तिकीट देण्यात आले असेल तर ते महाराष्ट्रातून देण्यात यावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी हायकमांडकडे केली होती.
थोडक्यात बातम्या-
‘शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळत असल्याने केंद्र सरकारला पाहवत नाही’
मोठी बातमी ! राज ठाकरेंवर 1 जूनला शस्त्रक्रिया होणार
उदयनराजेंनी रस्त्यावरील मुलीकडून सगळी पुस्तके विकत घेतली, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
‘मी माझे कपडे विकून लोकांना…’; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं मोठं वक्तव्य
“किमान राजघराण्यातील व्यक्तींनी संज्यासारख्या फडतूस माणसाला…”
Comments are closed.