पुणे | महाराष्ट्राची राजकीय संस्कृती सुसंस्कृत म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राने आपली पातळी सोडली नाही आणि सोडणारही नाही, अशा शब्दांत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाध्यक्ष अमित शाहांवर हल्लाबोल केला आहे.
महाआघाडीची खिल्ली उडवणाऱ्या अमित शहांवर त्यांनी जेजुरीमध्ये तोफ डागली. ‘महागठबंधन’ म्हणजे ‘ठगबंधन’ अशा शब्दांत अमित शहांनी महाआघाडीवर टीका केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आणि अमित शहांचा आमच्यावर एवढा रोष का आहे, हेच मला समजत नाही, असंही सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांचं जोरदार वारं वाहू लागलं आहे मग राजकीय चिखलफेक तर होणारच… त्याचीच ही झलक असू शकते…!
महत्वाच्या बातम्या-
–आलिया भट्टची जुळी बहिण पाहिलीत का? पाहा व्हीडिओ
–बारामतीची उमेदवारी सुप्रिया सुळे देणार एका सर्वसामान्य मुलीला पण त्या आधी…..
–“पवारांचाच प्रचार करायचाय तर भाजपमुळे मिळालेली पदं सोडा”
–‘पवारांचा नातू आणि विखेंच्या मुलाची भेट’; या अनोख्या आघाडीचा अर्थ काय?
–शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा काँग्रेस आमदार अब्दुल सत्तारांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव!