Suresh Dhas l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून 9 डिसेंबरला हत्या करण्यात आली. मात्र संतोष देशमुखांच्या या हत्येमुळे राज्यातील वातावरण प्रचंड तापलं आहे. कारण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, तसेच त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राज्यातील विविध भागात आक्रोश आंदोलनं होत आहेत. दरम्यान, आज देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सरपंच परिषदेकडून आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात आमदार सुरेश धस हे देखील सहभागी होते.
आमदार सुरेश धस यांनी केली मोठी मागणी :
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतल्याच दिसत आहे. अशातच आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सरपंच परिषदेकडून झालेल्या आंदोलनात देखील त्यांनी एक मोठी मागणी केली आहे. यावेळी ते म्हणाले की, “कितीही वेळ जाऊ द्या पण संतोष देशमुख यांना मनातून उतरू देऊ नका. तसेच कितीही वेळ लागला तरी चालेल, आम्ही सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळून देऊ.” असं धस म्हणाले आहेत.
याशिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कोणालाही भेटू देऊ नका, तसेच आरोपींना त्यांच्या नातेवाईकांना भेटता आलं नाही पाहिजे अशी मोठी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी आंदोलनावेळी केली आहे.
Suresh Dhas l “आरोपींची तेरे नाम सारखी अवस्था करा” :
सुरेश धस पुढे म्हणाले की, “सरपंच परिषदेतील आक्रोश हा राज्यातील प्रत्येक भागात पोहोचला पाहिजे. तसेच आरोपींची तेरे नाम सारखी अवस्था करा, तसेच अंतुलेनंतर फडणवीस हेच पहिले असे मुख्यमंत्री आहेत की, जे सरपंचांच्या मागण्यांकडे प्रामुख्याने लक्ष देत आहेत”, असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच त्यांनी या प्रकरणावर बोलताना अनेकदा मोठे गंभीर आरोप देखील केले आहेत. त्यामुळे आता आमदार सुरेश धस यांनी आज आरोपींना कोणालाही भेटू देऊ नका अशी मागणी केली आहे.
News Title : Suresh Dhass new demand in the Santosh Deshmukh case
महत्वाच्या बातम्या –
HMPV व्हायरसमुळे पुणे महापालिकेने घेतला मोठा निर्णय!
मोठी बातमी! सरपंच संतोष देशमुख यांचा मारहाणीचा व्हिडीओ CID च्या हाती???
संतोष देशमुखांच्या भावाने ‘ती’ महत्वाची याचिका घेतली मागे!
‘या’ कारणास्तव आसाराम बापूला जामीन मंजूर!
मुंडे भाऊ-बहिणीविरोधात मराठा समाज आक्रमक, दोघांच्याही राजीनाम्याची केली मागणी