‘राहुल गांधींना लोकसभेतून निलंबित करा’; रामदास आठवलेंची मोठी मागणी
नागपूर | राज्यसभेत बुधवारी जोरदार गदारोळ झाला. विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी विरोधीपक्षाने आक्रमक भूमिका घेत राज्यसभेचं कामकाज बंद पाडलं. त्यानंतर सभागृहात मार्शलांना बोलवण्यात आलं. त्यावेळी गोंधळाच्या परिस्थितीत मार्शल आणि विरोधीपक्षाचे खासदार यांच्यात धक्काबुक्की झाली. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठी मागणी केली आहे.
राज्यसभेत घडलेला प्रकार हा संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना आहे. या अधिवेशनादरम्यान सरकारने संसदेत चर्चा करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु विरोधकांनी संसदेचं कामकाज बंद पाडलं. यात राहुल गांधी चुकीचं वागले, त्यामुळे राहुल गांधी यांना लोकसभेतून एका वर्षासाठी निलंबित केलं पाहिजे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते नागपूरमध्ये माध्यामांशी बोलत होते.
जे विरोधीपक्षाचे खासदार कामकाजाच्या वेळी सभागृहात येत होते आणि कामकाज बंद पाडत होते, त्या सर्वांना निलंबित केलं पाहिजे, असंही आठवले म्हणाले. राहुल गांधी सतत आरएसएस आणि भाजपवर संविधानाची पायमल्ली केल्याचा आरोप करतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानावर मस्तक ठेवतात. राहुल गांधीच्या वक्तव्यामुळेच आज काँग्रेसची ही दुर्दशा झालीय, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा भारत निर्माण करायचाय, त्यामुळेच सबका साथ, सबका विकास हे त्यांचं धोरण असल्याचं देखील आठवलेंनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
भागवत कराडांपेक्षा माझी उंची खूप मोठी, त्यांची माझ्याशी तुलनाच होऊ शकत नाही- चंद्रकांत खैरे
कोरोनाची ‘ही’ लस ठरतेय धोकादायक; अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
…म्हणून पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले चक्क कंडोम!
“महाराष्ट्रातील पेटत्या मशालींचे चटके दिल्लीस बसताच 127 व्या घटनादुरुतीचं पाऊल पडलं”
Comments are closed.