12 वर्षाच्या प्रेमाचा भयंकर शेवट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

त्रिवेंद्र | केरळमधील त्रिवेंद्रममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने दिवसाढवळ्या आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली. आरोपीने महिलेवर चाकूने अनेक वार केले.

सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. ही संपूर्ण घटना त्रिवेंद्रमच्या पेरूरकाडा भागातील असल्याची माहिती आहे. सिंधू असं महिलेचं नाव आहे. तर मारेकऱ्याचं नाव रागेश असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघं जवळपास 12 वर्षे एकत्र राहत होते.

हत्येमागील कारण परस्पर वैमनस्य असल्याचं बोललं जात आहे. या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. दोघांमध्ये अनेकदा वाद व्हायचे. त्यामुळे ही महिला काही काळ आरोपीपासून वेगळी राहत होती. पैशाच्या व्यवहारावरून दोघांमध्ये वाद झाल्याचं कळतंय.

हल्ल्यानंतर महिला रस्त्यावर पडली आणि वेदनेने ओरडू लागली. दरम्यान, तेथून आलेल्या तरुणांच्या टोळक्याने त्याला पाहिले. त्यानंतर लगेचच हल्लेखोराला थांबवून पोलिसांच्या ताब्यात दिले.

आरोपींनी महिलेवर चाकूने सुमारे 10 वार केल्याची माहिती आहे. त्याच्या शरीरावर खोल जखमा होत्या. पोलिस सूत्रांचं म्हणणं आहे की सिंधू संबंध संपवण्याच्या विचारात होती, त्यामुळेच आरोपीने हा संपूर्ण प्रकार घडवून आणला.

महत्त्वाच्या बातम्या-