मुंबई | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातही फिल्म सिटी उभारण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकारणाला सुरुवात झाल्याचं दिसतंय.
या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील सत्त्याधाऱ्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
नवाब मलिक म्हणाले, “योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात फिल्म सिटी तयार करण्याची गोष्ट करत असून ही चांगलीच बाब आहे. मात्र एक समजून घ्यावं की मुंबईला मिळालेला 100 वर्षांपासूनचा बॉलिवूडचा दर्जा संपणार नाही.”
“एकवेळ लोकं पूर्णतः इतर राज्यांमध्ये निघून जातील, परंतु बॉलिवूडचा दर्जा कोणीही संपवू शकणार नाही,” अशा शब्दांत नवाब मलिक यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधलाय.
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या वनडेत भारताचं ऑस्ट्रेलियाला 303 रन्सचं आव्हान; पंड्या-जडेजाची अर्धशतकी खेळी
“माझ्याकडे 13 एकर आहे… तुला काम नसेल तर माझ्या शेतात मजुरीला ये”
“उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना जमणार नाही”
“अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’”
भाजप खासदार आणि अभिनेते सनी देओल यांना कोरोनाची लागण