Bachchu Kadu l विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं आहे. तर तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका असलेल्या बच्चू कडू यांचा देखील यावेळी पराभव झाला आहे. यावेळी अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का बसला आहे. मात्र आता पराभवानंतर बच्चू कडू यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
बच्चू कडू नेमकं काय म्हणाले? :
यावेळी बच्चू कडू म्हणले की, मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. कारण त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. तसेच माझ्या या पराभवाने तुम्ही खचून जाऊ नका, बच्चू कडू पदामुळे नाही तर कार्यामुळे आहे. हे कार्य आपण असेच पुढे करत राहू. तसेच तुम्ही स्वतःला एकटे समजू नका.
कारण आपण आज हरलो तरी उद्या आपण नक्की जिंकू. तसेच कुठे चुकलो असेल, कुठे कमी पडलं असेल त्याचा शोध देखील नक्की घेऊ, असं बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.
Bachchu Kadu l अचलपूरमध्ये तिसऱ्या आघाडीला अपशय :
अचलपूर मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत झाली आहे. यावेळी महायुतीकडून भाजपचे प्रवीण तायडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती.
मात्र यावेळी तिसऱ्या आघाडीकडून बच्चू कडू यांनी या मतदारसंघात निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना या मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच यावेळी भाजपचे प्रवीण तायडे हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
News Title – Vidhansabha Results Bachu Kadu’s First Reaction on Defeat
महत्त्वाच्या बातम्या-
निकालानंतर शिंदे गट अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, कुठं घडली घटना?
निकालाबाबत राऊतांचा अजबच दावा; म्हणाले, “जे घडलं त्याला धनंजय चंद्रचूड..”
मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्रिपदाचा पॅटर्न कायम राहणार का?
शिंदेसेना ठरली वरचढ, पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
पतीच्या पराभवानंतर स्वरा भास्करची पोस्ट; म्हणाली, “EVM मध्ये घोटाळा..”