Mumbai Rain | मुंबईमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसाने मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले आहेत. मुंबईत 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून मुंबईकरांनी (Mumbai Rain ) याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवरच कॉँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारला चांगलेच फटकारले आहे. आज ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मुंबईच्या अशा अवस्थेला सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं.
विजय वडेट्टीवार यांची टीका
विजय वडेट्टीवार यांनी सरकारला व्यवस्थापन जमत नाही. अपयशी सरकार अशी ओळख सरकारची निर्माण झाल्याची टीका केली आहे. 300 मिमीमध्ये अशी परिस्थिती होत असेल तर काय? अनेक कामं राहिली होती. त्यांना कामे करता आली नाहीत. टक्केवारी आणि कमिशनखोरीत सरकार अडकलंय, असा संताप यावेळी वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय.
याबाबत वडेट्टीवार यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) एक व्हिडिओ देखील (Mumbai Rain ) शेअर केलाय. “मुख्यमंत्र्यांसाठी ग्रीन कार्पेट, मुंबईकरांसाठी जिकडे तिकडे चिखल! ग्रीन कार्पेट टाकून नाले सफाई कामाची पाहणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पहिल्याच पावसाने त्यांच्या कामाची पावती दिली आहे. केंद्रापासून मुंबई महानगरपालिका पर्यंत यांचीच सत्ता आहे. तरी सुद्धा पहिल्याच पावसात मुंबई यांनी तुंबून दाखवली.”, असं ट्वीट वडेट्टीवार यांनी केलंय.
#Live : पत्रकार परिषद, मुंबई https://t.co/HXGkJ630fF
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) July 8, 2024
मंत्रीच अडकत असतील तर बाकीच्यांचं काय?
दरम्यान, मुंबईच्या या पावसाचा आमदार आणि मंत्र्यांनाही फटका बसला आहे. मंत्री अनिल पाटील (Anil Patil) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना रेल्वे ट्रॅकवरुन चालण्याची वेळ आली. मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना देखील (Mumbai Rain ) मुंबईच्या पावसाचा फटका बसला.
यावरून विजय वडेट्टीवार यांनी “मंत्रीच अडकत असतील तर बाकीच्यांचं काय होणार? हे सरकार काहीच करु शकत नाही. अपयशी सरकार अशी यांची ओळख निर्माण झाली आहे.”,अशी टीका केली.
News Title : Vijay Wadettiwar target govt over Mumbai Rain
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! पुण्यात भरधाव वेगाने 2 पोलिसांना चिरडलं; एकाच मृत्यू तर…
आज राज्यात कसं असणार हवामान? ‘या’ भागाला यलो अलर्ट
या राशीच्या व्यक्तींनी नात्यात दुरावा येणार नाही याची काळजी घ्यावी
पावसाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ भागातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
दुःखद! ऑस्कर विजेत्यानं घेतला जगाचा निरोप