Weather Update Maharashtra | राज्यभरात गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस बरसला आहे. जुलै महिन्यात सरासरीच्या 138 टक्के जास्त पाऊस झाल्याची माहिती पुणे वेधशाळेणेने दिली आहे. मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि विदर्भ येथे पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला. यामुळे (Weather Update Maharashtra) जनजीवन विस्कळीत झाले.
हवामान विभागाने आता येत्या 4 ते 5 दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज दिला आहे. राज्यातील अनेक धरणे 90 टक्के भरले असून पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुण्याच्या घाट विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने आज (31 जुलै) ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांना यलो (Weather Update Maharashtra)अलर्ट दिला आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला मोठा इशारा
तसेच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात दोन ते तीन ऑगस्टला तुरळक ठिकाणी (Weather Update Maharashtra)वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 आणि 3 ऑगस्टला येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
News Title- Weather Update Maharashtra 31 july
महत्वाच्या बातम्या-
ऐकावं ते नवलंच! टेलीग्रामचा संस्थापक तब्बल 100 मुलांचा बाप, स्वतःच केला खुलासा
पती अभिषेकला सोडून ऐश्वर्या राय पोहोचली परदेशी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठा बदल; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनदर
“तुला तुडवणारच, कुत्र्यासारखं मारणार”; मनसे नेत्याने काढली अमोल मिटकरींची लायकी
“राहुल गांधी ड्रग्ज घेतात, त्यांची चाचणी…”; कंगना रनौतचं मोठं वक्तव्य