श्रीनगर | अफवा आणि खोट्या बातम्यांवर लगाम लावण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्हा प्रशासनाने कठोर निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअॅपवरील सर्व ग्रुप अॅडमिन्सनी 10 दिवसांत राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान केंद्रात (एनआयसी) नोंदणी करावी, असा आदेश देण्यात आला आहे.
ग्रुपवरील मेसेजसाठी अॅडमिन्स जबाबदार असतील. नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना आयटी अॅक्ट आणि भारतीय दंड विधानातील अन्य कलमांतर्गत कारवाईचा सामना करावा लागेल, असे या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबत समाजाप्रती जबाबदारीही महत्त्वाची आहे. त्यामुळे नोंदणी न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-विरोधकांनी शरद पवारांपासून सावध रहायला हवं- शिवसेना
-एकदा हे राज्य हातात देऊन तर बघा, कोणी रडताना दिसणार नाही- राज ठाकरे
-भारताला बुलेट ट्रेनची गरज नाही, रेल्वेला सक्षम करा- मेट्रो मॅन
-ट्रोल झाल्यानं सुषमा स्वराज दुःखी; ट्विटरवर घेतला पोल
-अॅट्रॉसिटी कायद्याचा मराठा समाजाकडूनच गैरवापर- रामदास आठवले