नवी दिल्ली | लहान बाळ (Baby) जन्माला येणं म्हणजे त्या घरातील एक नवीन सणच असतो. आपल बाळ छान आरोग्यदायी आणि सुंदर असावं असं प्रत्येकालाच वाटतं. आजही अनेकांना असं वाटतं की आपलं बाळ गोर आणि गुटगुटीत जन्माला यावं. बाळ गोर व्हावं यासाठी त्याची आई गर्भवती असताना अनेक प्रयोग करते.
भारतात (India) मात्र असं एक ठिकाण आहे जिथं गोरं बाळ जन्माला आलं की त्याची हत्या केली जाते. या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवणार नाही मात्र, भारतातील अंदमान (Andaman) बेटावर हे असं केलं जात. अंदमानातील जारवा आदिवासी समाजात ही क्रूर आणि भयंकर प्रथा पाळली जाते.
जारवा आदिवासी जमात (Tribal tribe) ही मूळची आफ्रिकेची मानली जाते. या जमातीतील शक्यतो सगळेच लोक काळ्या रंगाचे असतात. त्यांची त्वचा काळ्या रंगाची असते. या जमातीत गोरं बाळ जन्माला आलं तर ते आपल्या जामातींच नसल्याचं मानलं जात, त्यामुळे त्या निष्पाप बाळाची हत्या केली जाते.
या जमातीत अनेक भयंकर प्रथा पाळल्या जातात. नवजात बाळाला या जमातीतील सगळ्या कुलातील स्त्रीयांचं दूध पाजलं जात. तसेच ज्याप्रमाणे इतर ठिकाणी गोरं बाळ जन्माला यावं यासाठी प्रयत्न केले जातात ,तसे प्रयत्न काळं बाळ जन्माला यावं यासाठी केले जातात. गरोदर महिलेला प्राण्याचं रक्त पाजल्यास ते बाळ काळं (Black) होईल असं मानलं जात.
महत्त्वाच्या बातम्या
- …म्हणून मी विजयाचा जल्लोष करणार नाही- सत्यजित तांबे
- अखेर मानसी नाईकने तिच्या घटस्फोटाबद्दल खुलासा केलाच, म्हणाली…
- पठाण बाॅक्स ऑफीसवर घसरला, आकडा वाचून व्हाल आश्चर्यचकित
- राखी सावंतचं दुसरं लग्नही धोक्यात! धक्कादायक कारण आलं समोर
- नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; काय आहे नेमकं प्रकरण?