“1993च्या बॉम्बस्फोटाच्या जखमा अजूनही ताज्या, उद्धवजी मांडीला मांडी लावून…”
मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याने भाजपने आक्रमक भूमिका घेत आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा यासाठी भाजपकडून मुंबईत विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
1993 मधील बॉम्बस्फोटाच्या जखमा अजून ताज्या आहेत. 84 लोक बॉम्बस्फोटात मारली गेली. बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद होता. त्या बॉम्बस्फोटातील एक पिडीत आज आला आहे, तुषार हा त्यावेळी सज्ञान देखील नव्हता. वरळी सेंचूरी बाजाराजवळ टॅक्सित स्फोट झाला अन् तुषार देशमुखची आई जळून खाक झाली, असं आशिष शेलारांनी म्हटलं आहे.
मंत्रिमंडळामध्ये एक व्यक्ती अशी आहे की, जी मेमनला फाशी देऊ नका, म्हणाली होती. त्या व्यक्तीचं नाव काय तर अस्लम शेख. उद्धवजी तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही म्हणता, साडेतीन जिल्हा म्हणजे महाराष्ट्र होत नाही, अशी जोरदार टीका आशिष शेलारांनी केली आहे.
दरम्यान, भाजपचा हा मोर्चा आक्रोश आणि व्यथा मांडणारा मोर्चा आहे. भाजपचा मोर्चा नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आहे, असं आशिष शेलारांनी म्हटलं आहे. दाऊदने या देशावर आक्रमण केलं. बॉम्बस्फोट घडवून आणले. या बॉम्बस्फोटामध्ये अनेक निष्पाप लोक मारली गेली. महाराष्ट्र कधी दाऊदच्या कराचीसमोर झुकणार नाही, असं आशिष शेलारांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार ‘इतक्या’ सुट्या, केंद्र सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय
“उद्धवजी, तुमचं आमचं जमत नसेल तर सोडून द्या, सरकार तुम्हाला… “
“शरद पवार महाविकास आघाडीवर नागासारखे बसलेत”
“मलिकांविरोधात ईडीजवळ पुरावे, दाऊदच्या माणसाचा राजीनामा घेतलाच पाहिजे”
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या ताब्यात
Comments are closed.